दि 21/02/2025 घडलेला हा प्रसंग अवैध वाळू चे आणखी पाच निष्पाप बळी. प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार? भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघातील पासोडी गावच्या शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि. 22 फेब्रुवारी, शनिवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली. अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजी पणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी
*सांस्कृतिक कार्यक्रम के साथ चेटीचंड पर्व पर चार दिवसीय आयोजनों का हुआ आगाज*
8 hours ago
होली मिलन समारोह एवंसम्मान समारोह सम्पन
8 hours ago
आत्मा को शुद्ध करने के लिए पहले संपूर्ण पापों का प्रायश्चित होना चाहिए बड़ौद. श्री आनंदचंद्र जैन आराधना भवन में परम पूज्य मुनिराज श्री प्रियदर्शनविजयजी महाराज साहेब ने प्रवचन के माध्यम से बताया
11 hours ago
*मंदिर निर्माण के साथ भैरवजी ओर माताजी की स्थापना*
12 hours ago
बड़े धार्मिक उत्साह के साथ भगवान आदिनाथ की जयंती से महावीर जयंती तक प्रतिदिन भजन संध्या एवं सांस्कृतिक कार्यक्रमो की प्रस्तुति।
12 hours ago
आगामी त्योहारों को देखते हुए शांति व्यवस्था कायम रखने हेतु कलेक्टर एवं पुलिस अधीक्षक द्वारा शहर मे निकाला गया पैदल फ्लैग मार्च
13 hours ago
*सिंधी समाज द्वारा नगर में चेटीचंड के मौक पर निकाली गयी ऐतिहासिक वाहन रैली*
13 hours ago
“आदिरंग” महोत्सव के दूसरे दिन 21 मार्च को गणगौर नृत्य, ढीमसा नृत्य, लहंगी नृत्य और भीली गायन होगा
13 hours ago
छनेरा में “संकल्प से समाधान अभियान” के तहत खंड स्तरीय शिविर संपन्न
13 hours ago
पेट्रोलियम पदार्थों की व्यवस्थित आपूर्ति के लिए कंट्रोल रूम स्थापित